Monday, 18 August 2025

पळसप येथे इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स तर्फे वृक्षारोपण

धाराशिव:-
इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स यांच्या वतीने पळसप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. तानाजी लाकाळ,  अतिरिक्‍त जिल्हा शल्य चिकित्सक,धाराशिव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपक्रमामध्ये विविध प्रकारच्या छायादार व फळझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.तसेच झाडांच्या संगोपनासाठी डॉ. तानाजी लाकाळ यांनी ट्री गार्ड भेट दिली. 

या वेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. अभय शहापुरकर, डॉ. दत्तात्रय खुणे ,डॉ. सुधीर मुळे, डॉ.प्रसाद धर्म, डॉ.नितीन भोसले  आवर्जून  उपस्थित होते. ग्रामस्थ, शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या आवारात हिरवाई निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी तसेच गाव हरित व स्वच्छ ठेवण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. लावलेली झाडे जपून ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Thursday, 7 August 2025

धाराशिवमध्ये समाजासाठी प्रेरणादायी पाऊल – दोन मृत व्यक्तींचे यशस्वी देहदान

धाराशिव | ७ ऑगस्ट २०२५:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे आज दोन मृत व्यक्तींच्या देहांचे यशस्वीपणे देहदान करण्यात आले. या समाजहिताच्या कार्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला मोलाची मदत होणार असून, इतरांसाठीही एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.

पहिले देहदान कै. श्री. सुभाष काशिनाथ सूर्यवंशी (वय ७५, सोलापूर – सेवानिवृत्त शिक्षक) यांचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुलांनी  नितीन व सऺतोष सूर्यवंशी  यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेञ नानीजधाम ता.जि.रत्नागिरी,  यांच्या प्रेरनेने देहदानाची इच्छा व्यक्त केली.

दुसरे देहदान कै.श्रीमती सिताबाई बापुराव रणदिवे (वय ७०) यांचे करण्यात आले. त्यांचे चुलत नातु दत्ता रणदिवे व उपसरपऺच सतिष खराटे याऺनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित राहून देहदानासाठी पुढाकार घेतला.

या दोन्ही देहांचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी उपयोग करण्यात येणार आहे. शरीररचना विभागाच्या नियोजनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. या कार्यात डॉ. स्वाती पाऺढरे (प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरीररचना विभाग), डॉ. सुवर्णा आनंदवाडीकर (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. तानाजी लाकाळ (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. विश्वजीत पवार (प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र), श्री. प्रशाऺत बनसोडे, श्री. पंकज कसबे प्रयोगशाळा तऺञज्ञ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

संपूर्ण प्रक्रियेसाठी मार्गदर्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेऺद्र चौहान यांचे लाभले. त्यांनी देहदान करणाऱ्या कुटुंबीयांचे विशेष आभार मानले आणि हे कार्य वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व प्रशिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.

देहदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून समाजातील इतरांनीही याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

Friday, 25 July 2025

तुळजाभवानी मंदिरात लाडू प्रसाद सेवेचा शुभारंभ

जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दि.२५ जुलै २०२५ रोजी श्री तुळजाभवानी मंदिरात लाडू प्रसाद सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

Wednesday, 6 April 2022

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

 

उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांनी केले.

डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.6)रोजी डॉ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना श्री.मिटकर बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही.जी.शिंदे हे होते. यावेळी प्रा.डाॅ. स्मिता कोल्हे, प्रा. शहा, प्रा.चंदनी घोगरे, प्रा.  श्रीयश महिंद्रकर, प्रा. अजित शिंदे, प्रा. श्री.बारकुल, प्रा. श्री.मडके, प्रा. नितीन कुंभार, प्रा. संजय आंबेकर,डाॅ.गोलवाल,शिवछत्रपती पुरस्कार विजेते शाहूराज  खोगरे श्री.बागल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

मिटकर म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात असंख्य अडचणी,प्रश्न आहेत, शासकीय स्तरावर त्या सोडवण्यासाठी मर्यादा येतात. अशावेळी लॅा चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करत रहावे. श्री.मिटकर यांनी त्यांच्या सामाजिक कामात आलेले अनेक अनुभव निवेदन करून विद्यार्थ्यांना प्रश्नांची जाण निर्माण करून दिली.

यावेळी डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्थेमध्ये पुढील पाच वर्षासाठी सामाजिक विषयावर काम करण्यासाठी सामंजस्य करार झाला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थीती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नितीन कुंभार तर आभार प्रदर्शन प्रा.संजय आंबेकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Friday, 3 December 2021

उस्मानाबाद - सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात भाजपचे चक्काजाम आंदोलन पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर दिशा ठरवू - आ. राणाजगजितसिंह पाटील






 




उस्मानाबाद -

कृषी पंपाची वीज पुरवठा खंडित करू नये, खंडित केलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी या मागणीसाठी  आज उस्मानाबाद शहरातील अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

खरीपातील नुकसानीपोटी महाविकास आघाडी सरकार कडून दिलेल्या शब्द न गेला नाही. एकही शेतकऱ्याला हे. १० हजार अनुदान मिळाले नाही. जे तुटपुंजे अनुदान दिले तेही पूर्ण वितरीत करण्यात आलेले नाही. अशामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेठीस पकडून ऐन रब्बी हंगामात वीज तोडणी करत महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने अन्यायकारक वसुली मोहीम सुरु केली आहे हे थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दि.१७ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर दोन मंत्रीमंडळाच्या बैठका होवून देखील या गंभीर विषयाबाबत कुठलेच सकारत्मक पाउल उचलण्यात आले नाही. याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. राणाजगतजिसिंह पाटील, नेताजी पाटील, दत्ता कुलकर्णी, प्रदीप शिंदे, रमेश रणदिवे,अमर बाकले, प्रशांत रणदिवे,राजसिंहा राजेनिंबाळकर, रामदास काळगे, इंद्रजीत देवकते, ओम नाईकवाडी,सतीश दंडनाईक, विजय शिंगाडे, आनंद कंदले, राहुल काकडे, अर्चना अंबुरे, पूजा देडे आदी उपस्थित होते.

Wednesday, 6 May 2020

१७ मेपर्यंत बस सेवा राहणार बंद



उस्मानाबाद,
लॉकडाऊन क्रमांक 3 अंतिम दिवसापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी दिले आहेत.
 म्हणजेच जिल्ह्यात 17 मे पर्यंत बस सेवा सुरू होणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारी असलेले सोलापूर, लातूर, नगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाने ग्रासलेले रुग्ण आढळले आहेत. बस सेवा सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कोरोणा संसर्ग अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी मुधोळ - मुंडे यांनी बस सेवा बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

Monday, 4 May 2020

माय-लेकी करताहेत "कोरोना"शी दोन हात

 
 
 उस्मानाबाद, 
कोरोनाच्या विरोधामध्ये लढाई आता तीव्र झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील एका तलाठी आईने आपल्या तेरा महिन्याच्या छकुलीला सोबत घेऊन  ग्रामपंचायतच्या कोरोना सहाय्यता कक्षातून नागरिकांना घरीच राहा, सुरक्षित राहा असा संदेश देत आहेत. तर याच छकुलीचे वडील सातत्याने 15 तास चेक पोस्टवर डोळ्यात तेल घालून कोरोना बाधित आपल्या सीमा मध्ये येणार नाही याची दक्षता घेत आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथे काम करणार्‍या तलाठी वर्षा ढेकरे यांना केवळ तेरा महिन्याची  मुलगी आहे. सध्या लहान मुले व वृद्ध नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी तज्ञाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीतही ढेकरे या आपल्या तेरा महिन्याच्या छकुलीला सोबत घेउन कर्तव्य बजावत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोणाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असतानाही पहिल्यापासूनच संभाळण्यासाठी दुसरे कोणीही  नसल्यामुळे आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन कोरोना सहाय्यता कक्षेत कर्तव्य बजावत आहेत. वास्तविक पाहतां निवासाला असलेल्या आपल्या गावापासून जवळपास पंधराकिलोमीटर दूर असलेल्या गावात जाऊन कर्तव्य बजावण्याचे काम त्यांना करावे लागत आहे. सकाळी आपले सर्व नित्यकर्म आटपून गडबडीतच त्यांना गाव गाठावी लागते. भिकार सारोळा या गावात ही अन्य गावाप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या आहे. यामुळे  धोक्याची पातळी अन्य कर्मचाऱ्यांनी इतकीच आहे. वास्तविक पाहता आतापर्यंत शासनाने लहान मुले व वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे सांगितले आहे. मात्र स्वतःच्या नोकरी पोटी तलाठी यांना आपल्या लहानग्या 13 महिन्याच्या मुलीला झोळीत ठेवून काम करावे लागते. यासाठी त्यांनी नोंदणी केंद्रातच झोळी बांधली आहे. अधून मधून रडणाऱ्या लहानगीला जवळ घेऊन नोकरीचे कर्तव्य पार पाडावे लागते. त्यांचे पतीही तलाठी म्हणून कार्यरत आहेत, त्यांना उस्मानाबाद लातूर रस्त्यावरअसलेल्या चेक पोस्टवर ड्युटी देण्यात आली आहे, असे असतानाही त्यांनाही रात्रंदिवस याच पोस्टवर काम करावे लागते. त्यामुळे त्यांनाही या आपल्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांची ही कसरत पाहून सद्यस्थितीत पाहणार्‍याचे मन अधिकच हेलावत आहे.


अनेकांनी केलेली विचारपूस
अनेक महिला नेत्या व महिला अधिकाऱ्यांनी तलाठी ढेकरे यांची विचारपूस केली आहे. त्या सर्व जण मुलीची दक्षता घेण्यासाठी सल्ला देत आहेत. आतापर्यंत त्यांना खा. सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी संपर्क साधून विचारपूस केली आहे. त्यामुळे वेगळे बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

पळसप येथे इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स तर्फे वृक्षारोपण

धाराशिव:- इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स यांच्या वतीने पळसप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आल...