Wednesday 6 April 2022

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

 

उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांनी केले.

डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.6)रोजी डॉ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना श्री.मिटकर बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही.जी.शिंदे हे होते. यावेळी प्रा.डाॅ. स्मिता कोल्हे, प्रा. शहा, प्रा.चंदनी घोगरे, प्रा.  श्रीयश महिंद्रकर, प्रा. अजित शिंदे, प्रा. श्री.बारकुल, प्रा. श्री.मडके, प्रा. नितीन कुंभार, प्रा. संजय आंबेकर,डाॅ.गोलवाल,शिवछत्रपती पुरस्कार विजेते शाहूराज  खोगरे श्री.बागल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

मिटकर म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात असंख्य अडचणी,प्रश्न आहेत, शासकीय स्तरावर त्या सोडवण्यासाठी मर्यादा येतात. अशावेळी लॅा चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करत रहावे. श्री.मिटकर यांनी त्यांच्या सामाजिक कामात आलेले अनेक अनुभव निवेदन करून विद्यार्थ्यांना प्रश्नांची जाण निर्माण करून दिली.

यावेळी डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्थेमध्ये पुढील पाच वर्षासाठी सामाजिक विषयावर काम करण्यासाठी सामंजस्य करार झाला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थीती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नितीन कुंभार तर आभार प्रदर्शन प्रा.संजय आंबेकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

  उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक का...