Wednesday 6 May 2020

१७ मेपर्यंत बस सेवा राहणार बंद



उस्मानाबाद,
लॉकडाऊन क्रमांक 3 अंतिम दिवसापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी दिले आहेत.
 म्हणजेच जिल्ह्यात 17 मे पर्यंत बस सेवा सुरू होणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारी असलेले सोलापूर, लातूर, नगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाने ग्रासलेले रुग्ण आढळले आहेत. बस सेवा सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कोरोणा संसर्ग अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी मुधोळ - मुंडे यांनी बस सेवा बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

Monday 4 May 2020

माय-लेकी करताहेत "कोरोना"शी दोन हात

 
 
 उस्मानाबाद, 
कोरोनाच्या विरोधामध्ये लढाई आता तीव्र झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील एका तलाठी आईने आपल्या तेरा महिन्याच्या छकुलीला सोबत घेऊन  ग्रामपंचायतच्या कोरोना सहाय्यता कक्षातून नागरिकांना घरीच राहा, सुरक्षित राहा असा संदेश देत आहेत. तर याच छकुलीचे वडील सातत्याने 15 तास चेक पोस्टवर डोळ्यात तेल घालून कोरोना बाधित आपल्या सीमा मध्ये येणार नाही याची दक्षता घेत आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथे काम करणार्‍या तलाठी वर्षा ढेकरे यांना केवळ तेरा महिन्याची  मुलगी आहे. सध्या लहान मुले व वृद्ध नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी तज्ञाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीतही ढेकरे या आपल्या तेरा महिन्याच्या छकुलीला सोबत घेउन कर्तव्य बजावत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोणाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असतानाही पहिल्यापासूनच संभाळण्यासाठी दुसरे कोणीही  नसल्यामुळे आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन कोरोना सहाय्यता कक्षेत कर्तव्य बजावत आहेत. वास्तविक पाहतां निवासाला असलेल्या आपल्या गावापासून जवळपास पंधराकिलोमीटर दूर असलेल्या गावात जाऊन कर्तव्य बजावण्याचे काम त्यांना करावे लागत आहे. सकाळी आपले सर्व नित्यकर्म आटपून गडबडीतच त्यांना गाव गाठावी लागते. भिकार सारोळा या गावात ही अन्य गावाप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या आहे. यामुळे  धोक्याची पातळी अन्य कर्मचाऱ्यांनी इतकीच आहे. वास्तविक पाहता आतापर्यंत शासनाने लहान मुले व वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे सांगितले आहे. मात्र स्वतःच्या नोकरी पोटी तलाठी यांना आपल्या लहानग्या 13 महिन्याच्या मुलीला झोळीत ठेवून काम करावे लागते. यासाठी त्यांनी नोंदणी केंद्रातच झोळी बांधली आहे. अधून मधून रडणाऱ्या लहानगीला जवळ घेऊन नोकरीचे कर्तव्य पार पाडावे लागते. त्यांचे पतीही तलाठी म्हणून कार्यरत आहेत, त्यांना उस्मानाबाद लातूर रस्त्यावरअसलेल्या चेक पोस्टवर ड्युटी देण्यात आली आहे, असे असतानाही त्यांनाही रात्रंदिवस याच पोस्टवर काम करावे लागते. त्यामुळे त्यांनाही या आपल्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांची ही कसरत पाहून सद्यस्थितीत पाहणार्‍याचे मन अधिकच हेलावत आहे.


अनेकांनी केलेली विचारपूस
अनेक महिला नेत्या व महिला अधिकाऱ्यांनी तलाठी ढेकरे यांची विचारपूस केली आहे. त्या सर्व जण मुलीची दक्षता घेण्यासाठी सल्ला देत आहेत. आतापर्यंत त्यांना खा. सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी संपर्क साधून विचारपूस केली आहे. त्यामुळे वेगळे बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunday 3 May 2020

दिवसभर स्वॅब घेण्याचे काम...घरी गेल्यावर धाकधूक

 उस्मानाबाद, 
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अनेक डॉक्टरांना अक्षरशः तळहातावर शिर घेऊन काम करावे लागत आहे. डॉ तानाजी लाकाळ यांनाही अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागत असून दिवसभर स्वॉब घेण्याचे व तपासणीचे काम केल्यानंतर रात्र धोक्याची धाकधूक मनात घेऊनच घालवावी लागत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची कमी-अधिक प्रमाणात संख्या वाढत आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सद्यस्थितीत सर्व बाजार व अन्य गर्दीच्या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु, रुग्णालय सुरूच आहेत. सध्या स्थितीत केवळ रुग्णालयात गर्दीची ठिकाणी बनले आहेत. यामुळे येथील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. अशाच धोक्याच्या वातावरणामध्ये अनेक वैद्यकीय अधिकारी काम करत आहेत.
जिल्हा रुग्णालयात काम करणारे डॉ. तानाजी लाकाळ यांनाही अशाच पद्धतीचा परिस्थितीला त्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. डॉ. लाकाळ येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये टेस्टिंगसाठी नमुने घेण्याचे काम करत आहेत. हे करताना असताना अनेक काही बाधित रुग्णांशी संपर्क येऊ शकतो. यामुळे त्यांच्या मनामध्ये सातत्याने अस्वस्थता असते तसेच घरी गेल्यानंतर ही त्यांच्या मनामध्ये धोक्याची सातत्याने धाकधूक असते. आपल्यामुळे घरातील अन्य सदस्यांना धोका होऊ नये, म्हणून सर्व कपडे धुन्यास टाकून  ते घरात प्रवेश करतात. दिवसभर त्या कपड्यांना कोणी हात लावत नाही किंवा त्यांच्या जवळही जात नाही. तरीही अशी दक्षता घेऊनही मनामध्ये कोरोणाची भीती कायम असते. घरात गेल्यानंतर भोजना पासून सर्व कामे करत असताना मनामध्ये धोक्याची जाणीव कायम असते. सातत्याने धोक्याच्या वातावरणामध्ये स्वतःचे जीवन व्यतीत करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 
-
स्वतःच्या लहानग्या मुलाला दूर ठेवून
डॉ. लाकाळ हे जिल्हा रुग्णालयात काम करत आहेत. त्यांच्या पत्नी खासगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत.  ते दोघेही सातत्याने रुग्णांच्या संपर्कात येत असतात. यामुळे आपल्या स्वतःच्या लहान मुलांना दूर आपल्या मूळगावी ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांचा लहान मुलगा सातत्याने त्यांची आठवण काढतो. परंतु, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून समजूत घालून त्याला शांत करावे लागते.

-
सध्या डॉक्टरांना पीपीई किट परिधान करावे लागत आहेत. त्यातच सध्या तापमानही वाढलेले आहे. पारा 40 अंशाच्या पलीकडे गेला आहे. अशा परिस्थितीत किट परिधान केल्यानंतर उकाडा अधिक जाणवतो. त्यातल्या त्यात एसी व कुलर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उष्णतेच्या दाहक वातावरणामध्ये किट अंगावर ठेवूनच त्यांना काम करावे लागते.

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

  उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक का...