उस्मानाबाद,
लॉकडाऊन क्रमांक 3 अंतिम दिवसापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी दिले आहेत.
म्हणजेच जिल्ह्यात 17 मे पर्यंत बस सेवा सुरू होणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारी असलेले सोलापूर, लातूर, नगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाने ग्रासलेले रुग्ण आढळले आहेत. बस सेवा सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कोरोणा संसर्ग अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी मुधोळ - मुंडे यांनी बस सेवा बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित केला आहे.
No comments:
Post a Comment