Friday 3 December 2021

उस्मानाबाद - सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात भाजपचे चक्काजाम आंदोलन पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर दिशा ठरवू - आ. राणाजगजितसिंह पाटील






 




उस्मानाबाद -

कृषी पंपाची वीज पुरवठा खंडित करू नये, खंडित केलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी या मागणीसाठी  आज उस्मानाबाद शहरातील अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

खरीपातील नुकसानीपोटी महाविकास आघाडी सरकार कडून दिलेल्या शब्द न गेला नाही. एकही शेतकऱ्याला हे. १० हजार अनुदान मिळाले नाही. जे तुटपुंजे अनुदान दिले तेही पूर्ण वितरीत करण्यात आलेले नाही. अशामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेठीस पकडून ऐन रब्बी हंगामात वीज तोडणी करत महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने अन्यायकारक वसुली मोहीम सुरु केली आहे हे थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दि.१७ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर दोन मंत्रीमंडळाच्या बैठका होवून देखील या गंभीर विषयाबाबत कुठलेच सकारत्मक पाउल उचलण्यात आले नाही. याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. राणाजगतजिसिंह पाटील, नेताजी पाटील, दत्ता कुलकर्णी, प्रदीप शिंदे, रमेश रणदिवे,अमर बाकले, प्रशांत रणदिवे,राजसिंहा राजेनिंबाळकर, रामदास काळगे, इंद्रजीत देवकते, ओम नाईकवाडी,सतीश दंडनाईक, विजय शिंगाडे, आनंद कंदले, राहुल काकडे, अर्चना अंबुरे, पूजा देडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

  उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक का...