Monday 2 April 2018

उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका व मदतनीस यांचा गौरव


                                                                     दि. 28 मार्च 2018
उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका व मदतनीस यांचा गौरव

उस्मानाबाद.दि.28:-  जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त  उत्कृष्ट काम करणाऱ्या आदर्श 18 अंगणवाडी पर्यवेक्षिका, 65 अंगणवाडी सेविका व 67 मदतनीस यांचा प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद महिला सदस्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
            जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महिला व बालकल्याण सभापती सौ. सखुबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायणकर, महिला व बालकल्याण समिती सदस्या सक्षणा सलगर, श्रीमती.मीनाताई तोडकर, सौ. ज्योती पत्रिके, उषाताई यरकळ, श्रीमती.जयश्री खंडागळे, श्रीमती.अस्मिता कांबळे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव राजगुरु, श्री. उध्दव साळवी, श्रीमती.छायाताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश पवार, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आर्यचाणक्य विद्यालयाच्या विद्यार्थींनी स्वागतगीत सादर केले.
            यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील म्हणाले की, देशाचे भवितव्य अंगणवाडी केंद्रातून घडत असल्याने अंगणवाडी केंद्र अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
            अंगणवाडी सेविका यांचे स्थान बालकांच्या जीवनात आईबरोबरचे आहे, 14 व्या वित्त आयोगातून सर्व अंगणवाडी केंद्रांना टीव्ही संच घेण्याचे आवाहन करुन अंगणवाडीतील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.
            जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी अंगणवाडी सेविकांनी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
                        महिला बालकल्याण सभापती श्रीमती.पवार यांनी जिल्ह्यातील कुपोषण निर्मुलनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
            उप मुख्य कार्यकारी अधिकारी(बाक)श्री.बी.एच.निपाणीकर यांनी निती आयोग निर्देशांक, लोकसहभागातून सुरु करण्यात आलेले 170 ग्राम बालविकास केंद्र, सन 2018-22 चे व्हिजन डाक्युमेंट, अंगणवाडी प्रवेशोत्सव अभियान आदींबाबतची माहिती प्रास्ताविकातून विषद केली.
            जिल्ह्यातील दहा प्रकल्पांतर्गत कार्यकरत असलेल्या अंगणवाडी सेविकांपैकी ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्कृष्ट काम केले आहे त्यांचा प्रकल्पनिहाय सत्कार करण्यात आला. आयएसओ मानाकंन प्राप्त झालेल्या अंगणवाडी केंद्रांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.              

ग्रामविकासात लोकप्रतिनिधीची भूमिका आई-वडिलाप्रमाणे असावी -माजी जि.प.उपाध्यक्ष भारत पाटील


                                                                       दि. 5 फेब्रुवारी 2018
ग्रामविकासात लोकप्रतिनिधीची भूमिका आई-वडिलाप्रमाणे असावी
  -माजी जि.प.उपाध्यक्ष भारत पाटील

उस्‍मानाबाद, दि.5:-  आजच्या युगात ग्रामीण भागातील लोकांचा ओढा शहरीकरणाकडे वाढला आहे त्यामुळे गाव सुजलाम-सफलाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामविकासात लोकप्रतिनिधीची भूमिका आई-वडिलाप्रमाणे असावी, असे मत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. भारत पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.
            महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व लेडीज क्लब उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने “आद्या हिरकणी महोत्सव व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन 2018”  कार्यक्रमाचे आयोजन लेडीज क्लब, उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 2 वाजता “ग्रामविकासात लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची भूमिका” या विषयावर व्याख्यानाचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. भारत पाटील बोलत होते. यावेळी तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मधुकर देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रावसाहेब चव्हाण, सहाय्यक प्रकल्प संचालक श्री. तायडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्रीमती. गंगा सुरगीहळळी, गट विकास अधिकारी (कळंब) श्री. काळे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक रमाकांत गायकवाड आदीची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले की, आई –वडील आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करतात त्या प्रमाणे गावात काम करताना लोकप्रतिनिधीची भूमिका सकारात्मक, निष्ठेची, ऊर्जा देणारी असावी. हे गाव माझे कुटुंब आहे त्यामुळे या कुटुंबाला आतड्याची माया लावली पाहीजे. ग्रामस्तरावर काम करताना जगातल्या सर्व चांगल्या गोष्टी पाहून त्याचा अभ्यास करुन लोकप्रतिनिधीनी त्याचे अनुकरण करावे.
            हागणदारीमुक्त गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देश करायचे हा ध्यास घेऊन ते पुर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. गावपातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणी प्रशासनाला सोबत घेऊन सोडविल्या पाहीजेत. प्रत्येकाने मोठे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे. अस्वच्छता, कुपोषितपणामुळे आरोग्याची वाताहत होते, त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावणे, पाणी अडवणे आदी कामे करुन शौच्छालयाचा वापर केला पाहीजे. व्यसनमुक्त गाव करण्यासाठी महिलांनी संकल्प करावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी उपस्थित महिलांना यावेळी केले.
 या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमाकांम गायकवाड यांनी केले तर आभार सहाय्यक प्रकल्प संचालक श्री. तायडे यांनी मानले यावेळी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिला, लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                         *******

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

  उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक का...