Sunday 3 May 2020

दिवसभर स्वॅब घेण्याचे काम...घरी गेल्यावर धाकधूक

 उस्मानाबाद, 
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अनेक डॉक्टरांना अक्षरशः तळहातावर शिर घेऊन काम करावे लागत आहे. डॉ तानाजी लाकाळ यांनाही अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागत असून दिवसभर स्वॉब घेण्याचे व तपासणीचे काम केल्यानंतर रात्र धोक्याची धाकधूक मनात घेऊनच घालवावी लागत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची कमी-अधिक प्रमाणात संख्या वाढत आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सद्यस्थितीत सर्व बाजार व अन्य गर्दीच्या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु, रुग्णालय सुरूच आहेत. सध्या स्थितीत केवळ रुग्णालयात गर्दीची ठिकाणी बनले आहेत. यामुळे येथील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. अशाच धोक्याच्या वातावरणामध्ये अनेक वैद्यकीय अधिकारी काम करत आहेत.
जिल्हा रुग्णालयात काम करणारे डॉ. तानाजी लाकाळ यांनाही अशाच पद्धतीचा परिस्थितीला त्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. डॉ. लाकाळ येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये टेस्टिंगसाठी नमुने घेण्याचे काम करत आहेत. हे करताना असताना अनेक काही बाधित रुग्णांशी संपर्क येऊ शकतो. यामुळे त्यांच्या मनामध्ये सातत्याने अस्वस्थता असते तसेच घरी गेल्यानंतर ही त्यांच्या मनामध्ये धोक्याची सातत्याने धाकधूक असते. आपल्यामुळे घरातील अन्य सदस्यांना धोका होऊ नये, म्हणून सर्व कपडे धुन्यास टाकून  ते घरात प्रवेश करतात. दिवसभर त्या कपड्यांना कोणी हात लावत नाही किंवा त्यांच्या जवळही जात नाही. तरीही अशी दक्षता घेऊनही मनामध्ये कोरोणाची भीती कायम असते. घरात गेल्यानंतर भोजना पासून सर्व कामे करत असताना मनामध्ये धोक्याची जाणीव कायम असते. सातत्याने धोक्याच्या वातावरणामध्ये स्वतःचे जीवन व्यतीत करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 
-
स्वतःच्या लहानग्या मुलाला दूर ठेवून
डॉ. लाकाळ हे जिल्हा रुग्णालयात काम करत आहेत. त्यांच्या पत्नी खासगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत.  ते दोघेही सातत्याने रुग्णांच्या संपर्कात येत असतात. यामुळे आपल्या स्वतःच्या लहान मुलांना दूर आपल्या मूळगावी ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांचा लहान मुलगा सातत्याने त्यांची आठवण काढतो. परंतु, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून समजूत घालून त्याला शांत करावे लागते.

-
सध्या डॉक्टरांना पीपीई किट परिधान करावे लागत आहेत. त्यातच सध्या तापमानही वाढलेले आहे. पारा 40 अंशाच्या पलीकडे गेला आहे. अशा परिस्थितीत किट परिधान केल्यानंतर उकाडा अधिक जाणवतो. त्यातल्या त्यात एसी व कुलर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उष्णतेच्या दाहक वातावरणामध्ये किट अंगावर ठेवूनच त्यांना काम करावे लागते.

No comments:

Post a Comment

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

  उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक का...