Monday 8 April 2019

पळसप ग्रामपंचायतीची ′अशीही बनवाबनवी′


नवीन टँकरसाठी दाखविली जुनीच अधिग्रहित कूपनलिका
पळसप ता.5(बातमीदार):-गावात नवीन टँकर मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतने चक्क यापूर्वी अधिग्रहित केलेली कूपनलिका दाखवल्यामुळे स्थळपाहणीसाठी आलेलया उस्मानाबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्रोत नाकारला आहे. ग्रामपंचायतीच्या अशा बनवेगिरीमुळे टंचाईत होपळणाऱ्या ग्रामस्थांची टँकरची प्रतीक्षा वाढली आहे.
       गावची लोकसंख्या जवळपास आठ हजार असून गावासाठी भारत निर्माण योजना एक कोटी रुपये खर्च करुन राबविण्यात आली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहीर व कूपन‍लिका आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सध्या विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यासाठी त्यांना एक हजार लिटरसाठी दोनशे रुपये, 750 लिटरसाठी 125 रुपये, तर घागरभर आरओच्या शुध्द पाण्यासाठी 10 रुपये, वापरण्याच्या पाण्यासाठी आडीच रुपये मोजावे लागत आहेत.
गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी  सध्या एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या टँकरची क्षमता 24 हजार लिटर असल्याने कूपन‍लिकांवर ते भरण्यासाठी तीन ते साडेतीन तास व फेरी करुन परत येण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागत आहे.  वीजपुरवठा आठ तासच चालत असल्याने या टँकरला दोन फेऱ्या करणेही कठीण होत आहे. परिणामी या ठिकाणी 18 ते 20 दिवसाला नळाला पाणी पुरवठा होत आहे. आणखी दोन टँकर सुरु करण्याची मागणी नागरिकातून होऊ लागल्यावर ग्रामपंचायतने  टँकर मागणीचा प्रस्ताव पाठवून दिला. मात्र, प्रस्तावासोबत ज्या शेतकऱ्यांची कूपनलिका अगोदरच अधिग्रहित केली तीच पुन्हा टँकरसाठी दाखवल्याचे  उघडे पडले. पाहणी करण्यास आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनाही याचा अचंबा वाटला. यामुळे दाखवलेली कूपनलिका त्यांनी नामंजूर केली.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अशा खोटारडेपणाची गावात चांगलीच चर्चा आहे. पदाधिकाऱ्याच्या अशा खोटारडेपणामुळे ग्रामस्थांना आणखी काही दिवस टँकरपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
सध्या नवीन टँकर मागणीचा प्रस्ताव दिला असून पाणी स्त्रोत मिळत नसल्यामुळे टँकर मंजूरीस विलंब लागत आहे, लवकरच नवीन पाणी स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी स्त्रोत पाहण्यात येत आहे.
                                                     -दिलीप म्हेत्रे, सरपंच, पळसप


No comments:

Post a Comment

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

  उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक का...